दिनांक 1 मार्च 2026 रोजी भांडारकर इन्स्टिट्यूट, पुणे येथे 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मायमराठी कलासंगम' महोत्सवात 'गझल कार्यशाळे'त मार्गदर्शन करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आलेला हा लेख...
सरावन महिना आला की
स्वत: हडसनकर यांनी मला पाठवलेली माझी आवडती कविता माझ्या अत्यंत आवडत्या कवितांपैकी एक अशी कवी रविचंद्र हडसनकर यांची "सरावन महिना आला की " ही कविता गेले अनेक महिने शोधूनही ती पूर्ण कविता मला मिळाली नव्हती. नुकतीच मिळाली. या कवितेविषयी माझ्या शब्दांत थोडंसं... "सरावन महिना आला की " ही कविता आम्हाला पाठ्यपुस्तकात होती, कवितेत एक आई आणि आणि तिच्या गरीब कौटुंबिक परिस्थतीचे यथार्थ वर्णन " बाब्या'' या तिच्या मुलाच्या शब्दांत मांडले होते. कवीने यात विशेषत: लेकुरवाळी आई आणि तिच्या हतबलतेचे अतिशय प्रभावीपणे चित्रण केले आहे. या कवितेतील ग्रामीण बाज आणि एकूणच प्रभाव मला अजूनही खुणावत असतो. ''गरिबी हे एक दुष्टचक्र आहे'' असं म्हणतात हे वाक्य पुस्तकात वाचायला निबंधात लिहायला छान वाटतं पण या गरिबीच्या झळा ज्यांना बसल्या आहेत त्यांनाच त्याची तीव्रता समजते. 'सरावन महिना आला की' या कवितेत कवीने अशाच एका गरिब कुटुंबाचं चित्रण केलं आहे. "सरावन महिना आला कि, असाच जीव भंडावून जाते. आभाळ फाटल्यावाणी सांडू लागलं की आपली...

Comments
Post a Comment