Posts

Showing posts from December, 2022

चौदावे रत्न दाखवणे

  'चौदावं रत्न ' ---------------- भाषा हे संवादाचं माध्यम आहे. एकमेकांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी भाषेचा महत्त्वाचा उपयोग होतो. 'माणूस हा समाजशील/सामाजिक/समाजप्रिय प्राणी आहे' हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोतच. 'समाज निर्माण करणे आणि सामाजिक बनणे' माणसाला केवळ भाषेमुळेच शक्य होतं. मानवी भाषेत वेगवेगळे अर्थ संज्ञापित करण्याचं सामर्थ्य असल्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि विशिष्ट आहे. साहजिकच भाषेत विविध सौंदर्यवृद्धी करणार् ‍ या घटकांची उत्तरोत्तर भर पडत गेली आणि अधिकाधिक मानवी जीवन भाषेच्या अंगानेही अधिकाधिक समृद्ध बनत गेलं आहे. म्हणी, वाक्प्रचार, अलंकार वगैरे गोष्टी भाषेला मनोरंजक आणि आपलीशी अशी बनवतात. रुक्ष भाषा कोणालाही आवडत नाही. एखाद्या भाषणात वक्त्याच्या आवाजात चढउतार नसेल, वैविध्य नसेल आणि एकसुरीपणा असेल तर सभामंडपात शेवटी वक्ता आणि मंडपवाला असे दोघेच उरतात. हीच खरी भाषेची गंमत आहे आणि आपल्याला ती तिच्या विविध अंगांसह अवगत असेल तर आपलं बोलणं कधीच कंटाळवाणं होत नाही. वाक्प्रचार हा एक भाषेचा अतिशय मजेदार घटक. अनेकदा वाक्प्रचा...

व्याजोक्ती आणि व्याजस्तुती अलंकार

  शेर आणि भाषा माझ्या गझलमध्ये एक शेर आहे : लेक परततो जेव्हा मागे तेव्हा आई कळते, हसून म्हणते, ''माझ्या डोळ्यांमध्ये पाणी नसते ...'' - अनिल आठलेकर संवेदनशील मन असणाऱ्या व्यक्तीला या शेराचा अर्थ फार उलगडून सांगण्याची गरज नाही, पण या शेरातील एक गंमत सांगतो. या शेराच्या मांडणीत एक मराठी भाषेतील अलंकार वापरलेला आहे. कोणता? त्याचं नाव आहे : 'व्याजोक्ती' म्हणजे काय? सांगतो. व्याजोक्ती (व्याज + उक्ती ) म्हणजे खोटे कथन करणे. एखाद्या ठिकाणी जेव्हा खरी गोष्ट लपवून/दडवून तसे काही नाही असे भासवण्यासाठी वेगळेच (खोटे) सांगितले जाते, त्याला 'व्याजोक्ती' अलंकार म्हणतात. बाहेर पडणाऱ्या मुलाला वाईट वाटू नये म्हणून आपल्या डोळ्यांत पाणी वगैरे काहीच नाही असं सांगणारी आई, आतून मात्र दु:खी आहे, पण मुलाला सांगताना ती वेगळंच सांगते. आता आणखी एक गंमत. नावात असलेलं साधर्म्य पण अर्थ वेगळा असा याच्या जवळचा दुसरा अलंकार म्हणजे ' व्याजस्तुती ' याचं एक उदाहरण पहा : विठ्ठला जा तुला हवे ते कर मी तुला टिंब घाबरत नाही ... ~ वैवकु ( सौजन्य : 'गझल-विठ्ठल' गझलसंग्रह ) या शेरा...

श्लेष आणि पुनरुक्तवदाभास अलंकार

  कविता आणि भाषा अंजली लिमये-कुलकर्णीची 'खलिता' शीर्षक असणारी एक उत्तम कविता वाचली. कविता उत्तम आहेच, पण त्यातली एक ओळ खास वाचकांसाठी इथे उद्धृत करून आपण त्या अनुषंगाने दोन अलंकारांबद्दल आज जाणून घेऊ. ती ओळ अशी आहे : ' मनात आशा एकच केवळ फुटेल अंकुर ना त्याला?' ( अंजली लिमये -कुलकर्णी ) आता गंमत पहा. शेवटच्या दोन शब्दांकडे नीट लक्ष दिल्यास असं लक्षात येईल की उच्चार करत असताना हे सलग उच्चारले तर ती ओळ अशी होईल ... ' मनात आशा एकच केवळ फुटेल अंकुर नात्याला?' अर्थातच अर्थ बदलेल आणि कवयित्रीलाही अपेक्षित असा तो अर्थ नाही. तरीही ओळ मात्र नक्कीच अर्थपूर्ण आहे. आता या दोन ओळींचा संदर्भ घेऊन जर आपण अशी एक रचना केली : फार अपेक्षा नकाच ठेवू जगवा आधी नात्याला, मनात आशा एकच केवळ फुटेल अंकुर ना त्याला? ( वृत्त वगैरे विषय तूर्तास बाजूला ठेवून अलंकाराच्या दृष्टिकोनातून आपण या ओळींकडे पाहू ) आठवलं का काही ? बरोबर ! श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी न वरी हे उदाहरण कुठेतरी वाचल्याचं आठवलं ना ? आता आणखी एक ओळ पहा : 'मित्र' तू नाहीस केवळ, प्रेरणा आहेस तू .... या उ...