Posts

Showing posts from January, 2021

कवी आणि कविता : चिंतन

•============• कविता म्हणजे विश्व आहे, कवेत न सामावणारं. मनाचं एक अंगच जणू. कवितेची व्याख्या करण्याचा खूप जणांनी प्रयत्न केला आणि प्रत्येकाने त्याची त्याची अनुभूती मांडली. कवी कोणत्याही भौगोलिक प्रदेशातील असो त्याचं आणि कवितेचं नातं सारखंच असतं फक्त मांडणी निरनिराळी असते इतकंच! Aristotle म्हणतो ''Poetry is finer and more philosophical than history; for poetry expresses the universal, and history only the particular. '' तर Wordsworth म्हणतो, 'Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquillity.' खरं तर कविता आणि कवी एकमेकांशी एक अतूट धाग्याने बांधले गेलेले असतात एकमेंकांच्या सुखद:खाचे वाटेकरी असतात. विविध घटनाक्रम त्यांचं महत्व अधोरेखित करत असतात, यातूनच कवी वेगवेगळे प्रदेश पादाक्रांत करत असतो. म्हणूनच Matthew Arnold म्हणतो, 'Poetry is simply the most beautiful, impressive, and widely effective mode of saying things, and hence its importance.' कविता कुठून येते कुठे नेते कशी नेते हा सगळा ...

कविता स्फुरणे आणि कविता लिहिणे

  'आवड असली की सवड मिळते' हे वाक्य ऐकायला-बोलायला सोपं वाटतं पण आवडीसाठी वेळ काढताना काय काय दिव्यं करावी लागतात ते ती आवड आणि आपल्यालाच ठाऊक! उदाहरणार्थ लेखन. मग ते गद्य असो किंवा पद्य, विचार करायला जितका वेळ अधिक तितका तो साहित्यप्रकार सकस होण्याची शक्यता जास्त.हे सर्व खरं असलं तरी असं वातावरण आणि वेळ मिळणं फारच दुरापास्त. तरीही आपली आवड जोपासत राहणं, तिला पैलू पाडत राहणं हे सर्व अधिकाधिक रस घेऊन करणं महत्वाचं असतं, आनंदाचं असतं. गद्यलेखन करताना परिच्छेद-परिच्छेद टप्प्याटप्प्यात लिहीत पूर्ण करता येऊ शकतात. एक मध्यवर्ती कल्पना किंवा कथाबीज घेऊन त्याभोवती इतर पात्रे स्थळ-काळ-परिस्थितीनुसार यथावकाश रंगवता येतात, येऊ शकतात. अर्थात गद्यलेखनही तितकंच कठीण आहे पण मोठ्या कालावधीत ते पूर्ण करता येऊ शकतं किंबहुना त्या कथेची/लेखाची तशी मागणी असते पण कवितेचं मात्र तसं नाही, नसतं. निदान माझ्या अनुभवानुसार तरी. कविता ज्या मूडमध्ये असताना सुचते त्या मूडमध्ये/ट्रान्समध्ये असतानाच पूर्ण झाल्यास/केल्यास ती दमदार बनते,असते पण यालाही दोन बाजू आहेतच. त्या अशा-   ◆ कविता स्फुरणे व कविता लिहिण...

किनारा तुला पामराला!

Image
         रात्री झोपण्यापूर्वी मला छोटे छोटे व्हिडिओज पाहून झोपायची सवय आहे. फेसबुक किंवा यू-ट्यूबवर ‘शॉर्ट्स’ अशा नावाखाली असणारे हे व्हिडिओ रंजक असतात त्यामुळे दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो आणि ताण हलका होऊन शांत झोप लागते. असेच व्हिडिओ पाहत असताना अलीकडेच दोन परस्परविरोधी व्हीडिओज पाहण्यात आले. पहिल्या व्हिडिओत वाघ एका तळ्यात पाणी पीत असतो आणि तेवढ्यात अचानक मगर त्याच्यावर झडप घालून पाण्यात ओढून नेते आणि गिळंकृत करते. त्यानंतर काही वेळातच दुसरा व्हिडिओ समोर आला यात वर कुठेतरी झुडुपात बसलेला वाघ थेट पाण्यात झेप घेऊन तिथून महाकाय मगरीला आपल्या जबड्यात पकडून वर आणतो आणि फस्त करतो. व्हिडिओ छोटेसेच होते पण विचारांना चालना देणारे होते. त्यामुळे काही केल्या नजरेसमोरून ते जाईनात.       पहिली कसोटी (अॅडिलेड) :       आता गंमत पहा, भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाल्यापासून भल्या पहाटे उठून टीव्हीकडे डोळे लावून बसत असतानाही हे अर्थातच कुठेतरी आत सुरूच असायचं. वाघ तो वाघच असं जारी असलं तरी मग...

एका जिद्दीची 'कसोटी '

Image
________________ काही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागत नाहीत त्या आपोआप तुमच्याकडून होतात नाही केल्या जातात. 'लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्यसंपदा लाभे' हे सुभाषित लहानपणापासून आतापर्यंत लाखवेळा आईवडिलांकडून गुरुजनांकडून ऐकून, घोकून झालं असेल तरीही त्याची अंमलबजावणी तितकी काटेकोरपणे कधीच झाली नसेल; पण ऑस्ट्रेलियात मॅचेस आहेत म्हटल्यावर मात्र अलार्म न लावता पहाटे पाचला कशी जाग येते हे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला क्रिकेटप्रेमीचं हृदय असलं पाहिजे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू झाल्यापासून (डे नाइट मॅचेस वगळता) हा अलिखित नियमचं झाला होता जणू. पहिल्या कसोटीत आपण वाईट हरलो, अगदी आजपर्यंतची सर्वात कमी सांघिक धावसंख्या नोंदवली पण आम्ही आशा सोडली नाही. म्हणतात ना, “ उम्मीद पे दुनिया कायम है !” रहाणेच्या मनात मात्र काही वेगळंचं असावं. विराट पालकत्व रजा घेऊन भारतात परतला, शमी, उमेश यादव यासारखे आघाडीचे वेगवान गोलंदाज जायबंदी झाले. रोहितही नव्हता पण लढवय्या अजिंक्य नावाप्रमाणे लढला. टीम हडलमध्ये बहुधा त्याने असाच कानमंत्र दिला असावा. मेलबर्नमध्ये इतिहास घडला पण यावेळी विजयश्री भारताने खे...