Posts

Image
  दिनांक 1 मार्च 2026 रोजी भांडारकर इन्स्टिट्यूट, पुणे येथे 'महाराष्ट्र टाइम्स'तर्फे आयोजित 'मायमराठी कलासंगम' महोत्सवात 'गझल कार्यशाळे'त मार्गदर्शन करताना अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या. त्याबद्दल 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये आलेला हा लेख... 

अहमदाबादमध्ये भीमपराक्रम!

Image
  #आठलेकरी ---------------- गावाकडे एक म्हण आहे, 'रोज रोज काय दिवाळी नसते!' या म्हणीमागे जो काही अर्थ असेल, तो खराही असेल, पण मेहनत आणि चिकाटी जर तुमच्या अंगी असेल तर ही दिवाळी नक्कीच तुमच्यासाठी रोज-रोजही यायला तयार होईल एवढं नक्की! हे आज खरं करून दाखवलं भारतीय क्रिकेट संघाने! मागील टी20 विश्वचषक विजेता म्हणजेच गतविजेता भारत आपल्या घरच्या मैदानावर सलग वर्ल्डकप जिंकेल का ? इतिहासात आतापर्यंत तरी असं घडलेलं नाही,ऐनवेळी पुन्हा न्यूझीलंड घास हिरावून नेणार नाही ना, भारत 'इतिहास घडवेल का?' असे अनेक प्रश्न जवळजवळ प्रत्येक क्रिकेटप्रेमी स्वत:लाच प्रश्न विचारत होता! जागतिक क्रमवारीत नंबर 1ला असणारे बोलर-बॅटर दोन्ही भारताचे... जगातला सर्वोत्तम वेगवान गोलंदाज भारताकडे, दणदणीत अशी फलंदाजी फळी अशी सगळी तगडी टीम असली तरी T20 मॅच म्हणजे दोरीवर चालण्यासारखं असतं, जरा चूक झाली जरा तोल गेला की संपलं सगळं! भारताच्या संघानं मात्र यावेळी चंग बांधला होता! एकाचा तोल गेला तर दुसरा सावरत होता आणि पडण्याची वेळच येत नव्हती.एखादा अपवाद वगळता भारत राजासारखा खेळला. सर्वच मॅच उत्तम झाल्या आणि आज ...

इमोजीबाईचा स्मार्टफोन अन् आजीचा 'डिजिटल' पापा! 😎🎊🏃🙈😊🐒🤗❤️ #Emojidayspecial

Image
रोहनची आजी गावाकडे रहायची . वडिलांबरोबर आजीकडे गावी गेल्यावर टीव्ही बघण्याशिवाय त्याच्यापुढे दुसरा काही पर्याय उरत नसे. तिथे मोबाइल नेटवर्क नसल्याने . अगदी नेटवर्क नसल्याने शहरी परत आल्यावर आजीशी फोनवरसुद्धा बोलता येत नसे. कालांतरानं , गावी नेटवर्क आलं खरं , पण ते मध्येच यायचं मध्येच जायचं.   रोहन नव्या पिढीचा प्रतिनिधी , अगदी ‘ जेन झी ’ च म्हणा ना ! त्याच्याकडे स्मार्टफोन होता , पण गावी इंटरनेटच धड नसल्याने तो कंटाळून एकदा बोललाही ,   “ आजी , इथे र्रेंज का येत नाही ? मला बोअर होतं ! ”   आजी म्हणाली , “अरे आम्ही असेच दिवस काढले , आम्हाला रेंज-बिंज असली नसली तरी काही फरक पडत नाही. लोकांशी बोलणं , गप्पा मारणं आणि आपल्या संसारात रमणं. एवढं पुरायचं आम्हाला जगायला. “   रोहनला आजीचं म्हणणं जरा टोचलंच , पण त्याची पिढीच अशी आहे की मोबाइल हा त्यांच्या जगण्याचा अविभाज्य भाग झाला आहे , तोही त्याला अपवाद नाही. त्याला वाटलं आताची त्याची भावना आजीला ‘ इमोजी ’ स्वरुपात पाठवता आली असती , तर किती छान झालं असतं !   “मग तर तुला ‘ इमोजी ’ म्हणजे काय हेही क...

मराठीच्या बोली आणि बोलीभाषांमधील विविधता

Image
“चाय मांड वं...” “चहा ठेव गं...” “च्याय कर गो..." भाषा कोणतीही असो, प्रदेश कोणताही असो, घराघरात ऐकू येणारा हा हवाहवासा संवाद. कुणी मांड म्हणेल, कुणी टाक म्हणेल कुणी ठेव म्हणेल तर कुणी कर म्हणेल पण चहा होईल म्हणजे होईलच. चहा..! दोन अक्षरात किती जादू आहे! नाव घेतलं तरी तरतरी येते. सामान्य शेतकर्याचपासून ते अगदी राजकारण्यांपर्यंत, गरिबातल्या गरिबापासून ते अगदी गर्भश्रीमंत माणसापर्यंत सर्वांच्या घरी तितक्याच आवडीने आणि सहजतेने वावरणारा घटक म्हणजे चहा. शब्द वेगवेगळे असतील पण भावना मात्र तीच, किंबहुना अनुभवही तोच. हीच भाषेची गंमत आहे. भाषा हे माणसाला मिळालेलं वरदानच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. सर्व सजीवांमध्ये फक्त माणूसच भाषा बोलू शकतो, आपल्या भावना भाषेद्वारे व्यक्त करू शकतो. ही भाषा कशी निर्माण झाली याबाबत मात्र निश्चित अशी माहिती नाही. अभ्यासकांनी अनेक तर्क मांडले आहेत. ईश्वराने निर्माण केली, राजाने केली, निसर्गाकडून माणूस शिकला वगैरे वगैरे. यापैकी कोणत्याच तर्काने मात्र, भाषेची निर्मिती पुरेशा प्रमाणात स्पष्ट करू शकत नाहीत. आपल्या गरजा आणि आवश्यकता यांना अधिक प्रभावीपणे व्यक्त...

चौदावे रत्न दाखवणे

  'चौदावं रत्न ' ---------------- भाषा हे संवादाचं माध्यम आहे. एकमेकांमधील व्यवहार सुरळीत व्हावेत यासाठी भाषेचा महत्त्वाचा उपयोग होतो. 'माणूस हा समाजशील/सामाजिक/समाजप्रिय प्राणी आहे' हे वाक्य आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोतच. 'समाज निर्माण करणे आणि सामाजिक बनणे' माणसाला केवळ भाषेमुळेच शक्य होतं. मानवी भाषेत वेगवेगळे अर्थ संज्ञापित करण्याचं सामर्थ्य असल्यामुळेच माणूस इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आणि विशिष्ट आहे. साहजिकच भाषेत विविध सौंदर्यवृद्धी करणार् ‍ या घटकांची उत्तरोत्तर भर पडत गेली आणि अधिकाधिक मानवी जीवन भाषेच्या अंगानेही अधिकाधिक समृद्ध बनत गेलं आहे. म्हणी, वाक्प्रचार, अलंकार वगैरे गोष्टी भाषेला मनोरंजक आणि आपलीशी अशी बनवतात. रुक्ष भाषा कोणालाही आवडत नाही. एखाद्या भाषणात वक्त्याच्या आवाजात चढउतार नसेल, वैविध्य नसेल आणि एकसुरीपणा असेल तर सभामंडपात शेवटी वक्ता आणि मंडपवाला असे दोघेच उरतात. हीच खरी भाषेची गंमत आहे आणि आपल्याला ती तिच्या विविध अंगांसह अवगत असेल तर आपलं बोलणं कधीच कंटाळवाणं होत नाही. वाक्प्रचार हा एक भाषेचा अतिशय मजेदार घटक. अनेकदा वाक्प्रचा...