Posts

Showing posts from May, 2021

वृत्तबद्ध कविता, भाषा आणि शब्दनिर्मिती

         भाषा हा कोणत्याही प्रकारच्या लेखनाचा आधार. संवादाचं माध्यम म्हणजे भाषा. आपण सारे जाणतोच की लिखित आणि बोलली जाणारी असे साधारणत: वापरानुसार भाषेचे दोन भाग पडतात. दुसर् ‍ या प्रकारात विशिष्ट असेचं शब्द येतील किंवा आले पाहिजेत असं काहीही बंधन नसतं, नसावं पण लिखित प्रकारामध्ये मात्र तसं असतं. (त्याची कारणं आणि स्पष्टीकणं नंतर पाहू, तो आताचा मुद्दा नाही. ) ही लिखित भाषादेखील कालानुरूप बदलत असते आणि त्याचवेळी त्यात नवीन भरही पडत असते. यावेळी अजून एक घटक या भाषाबदलाच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे परकीय/द्वितीय भाषेचा प्रभाव. या सर्व मंथनातून अनेकदा होतं असं की दुसर् ‍ या भाषेतले सोपे शब्द आपल्या भाषेत घेतले जातात ( बॉरोड ). वापरानुकूलता हा निकष लावता ही एक स्वागतार्ह प्रक्रिया म्हटली पाहिजे पण याचवेळी अजून एक गोष्ट घडत असते ती म्हणजे आपल्याच भाषेतले पूर्वीचे शब्द हळूहळू कमी वापरले जातात. त्यामुळे अनेकदा पुढील पिढीला पर्यायी मराठी शब्दचं आठवत नाही. वाचन मर्यादित असेल तर ही अडचण अधिक परिणामकारकरित्या जाणवते. याला ठोस असा काही उपाय नस...

अक्षरगणवृत्तात काटेकोरपणा का महत्वाचा आहे ?

       मी अनेकदा ( गुणिले अनेकदा) सांगत असतो की अक्षरगणवृत्तात सूट घेताना विचार करा. कोणती सूट घेतल्यास चालेल, कोणती सूट त्या वृत्ताला पोषक नाही, याबद्दलही अनेकदा बोलत असतो. अनेकदा केवळ नवोदितच नाही तर प्रस्थापितांनादेखील हे थोडे जाचक वाटते, त्याहीपेक्षा अकारण वाटते. समोर बोलून दाखवत नसले तरी एकूण वर्तनावरुन ते लक्षात येतेच. असो.         ज्यांना निर्दोष, सकस आणि वैश्विक लिहायचं आहे तसेच ज्यांना नियम पाळणे म्हणजे अन्याय वाटत नाही त्यांच्यासाठी हा पोस्टप्रपंच. इतर मान्यवरांनी दुर्लक्ष (नेहमीप्रमाणे) केल्यास त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम. आता मुद्दयाकडे वळू. आपण सर्वजण जाणतोच, अक्षरगणवृत्त म्हटले की त्यात दोन नियम प्रामुख्याने पाळावेच लागतात. त्यातील पहिला नियम म्हणजे योग्य 'लगक्रम,' अर्थात, र् ‍ हस्व-दीर्घ अक्षरांचा योग्य क्रम. अक्षरगणवृत्ताच्या व्याख्येत/लक्षणात सांगितल्याप्रमाणे या अक्षरांचा योग्य क्रम, ते वृत्त त्या नावाचेच वृत्त असण्यास महत्वाचा असतो. दुसरा अतिशय महत्वाचा आणि काटेकोरपणे लक्षात ठेवायलाच हवा असा नियम म्हणजे 'अक्षरसं...

जावे नवरोबांच्या वंशा तेव्हा कळे !

Image
    असं म्हणतात की बदल हाच एकमेव स्थायीभाव आहे . काही बदल आपण स्वखुशीने करतो तर काही बदल मात्र नाइलाजाने करावे लागतात. आठवड्यातून एखादी सुट्टी मिळणं , ती कुटुंबासोबत मजेत घालवणं , बाहेर फिरायला वगैरे जाणं आणि मनसोक्त खादाडी वगैरे करणं हा क्रम आपल्याला पाठ असतो मात्र एकामागून एक अनेक आठवडे सक्तीची सुट्टी मिळणं आणि वर बाहेरही जाता न येणं , घरात स्थानबद्ध असणं हा भाग आपल्याला नवीन असतो. किंबहुना याची कल्पनाही आपण केलेली नसते पण ‘ होनी को कौन टाल सकता है! ’ गेल्यावर्षी कोविड नावाचा मानवजातीचा शत्रू थैमान घालू लागला आणि मग माणसाला घरात बसावंच लागलं.पूर्ण दिवस नवरा घरात असला की अर्थातच त्याच्यावर काय परिस्थिती येते हे वेगळं सांगायला हवं का ? गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये अनेक कला त्यामुळे अवगत झाल्या आणि आपल्याला असणार्‍या दोन हातांनी ऑफिसच्या कामाव्यतिरिक्तही आपण बरंच काही करू शकतो हा साक्षात्कारही झाला ! त्यामुळे त्यादरम्यान घराच्या साफसफाईपासून ते भांडी घासण्यापर्यंत अनेक कलांमध्ये अस्मादिक निपुण झाले. हळूहळू लॉकडाउनचा काळ संपला. न्यू नॉर्मल वगैरे शब्द कानावर पडू लागल...