ठाव नाही घेतला केव्हा मनाचा

ठाव नाही घेतला केव्हा मनाचा
भरवसा द्यावा तरी कोणी, कशाचा ?

कासवे हसतात आता शर्यतीला
जन्म हा म्हणतो नको, वंशज सशाचा

नावही बहुधा पुढे बुडणार आहे,
नेमका करणार तू धावा कुणाचा ?

केवढी जादू तुझ्या हातात आहे,
नाचवत आहेस घोडा कागदाचा

चिंब भिजलो केवढे छत्रीत आपण
दोष नाही त्यात काही पावसाचा

रंगली बागेत चर्चा ही दिवसभर
काढला काटा कुणी रात्री फुलाचा ?

काळजी घे नीट आता आपलीही
काळ आहे फार उलट्या काळजाचा ...

~ अनिल विद्याधर आठलेकर

Comments

Popular posts from this blog

सरावन महिना आला की

"आणि ..डॉ. काशिनाथ घाणेकर" : एका बेधुंद वादळाचा भन्नाट सुबोधाविष्कार !!

साधेपणाचा कळस !